‘मुंबई’चा वारसा सांस्कृतिक एकजुटीचा – ज्येष्ठ पत्रकार तथा खासदार कुमार केतकर महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला पुष्प तिसरे नवी दिल्ली, दि. २१ : रंगभूमी, साहित्य, चित्रपट, क्रीडा, सामाजिक व राजकीय घडामोडींचे केंद्र असलेली महाराष्ट्राची राजधानी ‘मुंबई’ ही देशाच्या सांस्कृतिक एकजुटीचा वारसा असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा विद्यमान खासदार कुमार केतकर यांनी आज केले. महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना ‘महाराष्ट्राचा ‘मुंबई’ वारसा’ या विषयावर श्री.केतकर बोलत होते. मुंबईचे व्यक्तीमत्व प्रामुख्याने गिरणगाव आणि यातील रंगभूमीने नटलेले होते. महाराष्ट्राची निर्मिती मुंबईसह व्हावी यासाठी १० ते १५ वर्षे प्रखर चळवळ झाली. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, गवाणकर यांच्या शाहिरीने नटलेली असल्याने त्यांचेही संस्कार मुंबईतील गिरणगावावर होते, असे श्री.केतकर म्हणाले. पुढे महाराष्ट्राची निर्मिती होऊन मुंबई ही राज्याची राजधानी झाली आणि मुंबईचे चित्र झपाट्याने बदलत गेले. गिरणगाव, गिरगाव, शिवाजी पा...
Very nice sir
ReplyDelete